Monday 13 April 2015

ती वेळ ..

ती वेळ अशी कां यावी, मनांला चटका लाउन जावी ..
कवंच कुण्डले निसटावी, माझी कठीण अवस्था व्हावी ..

कुणाला जाणीव ही ना कांही, मनाची घालमेल किती होई ..
कुणी तरी घातला घाला, त्याची कोण करील भरपाई ..

स्त्रोत तो, अखंड आठवणींचा, जाणवे, प्रवास आयुष्याचा ..
विलक्षण, अनुभव बालपणीचा, सुन्दर, प्रवास संस्कारांचा ..

सरले सारे ते जीवन, झाले एकाकी रे मन ..
पिता माता उरले नाही, कोण आता देई शिकवण ..

तरीही आवश्यक जगणे, आणि तसेच पुढती जाणे ..
याचे कारण नविन पिढीला,आहे संस्कारांचे देणे ..

हेच, समजावून मनांला, की तू, विसर त्या प्रसंगाला ..
पण, दुसरे मन मज सांगे, कसे विसरु माय पित्याला ..

बाजारी सारे मिळते, केवळ सोडून आईबापाला ..
श्रद्धांजली त्यांना वाहुन, तू आता शमवी मनांला ..

सुख सुखदुःखाच्या वेळेला, आठवा मायबापाला ..
आशिष घेऊन त्यांचे, वारसा जपा जो दिधला ..

विजय साठे ..
२७ / ०२ / २०१५ 

  

No comments:

Post a Comment